पत्रकारिता ते अभिनय हा अनोखा प्रवास साकारणारी अभिनेत्री.. अभिनयाच्या सोबतीने नॅट जिओ या प्रसिद्ध वहिनीसाठी कथा लेखक म्हणून काम..
अनेक नाटकांमधून अभिनयाची छबी उमटवणार्या अभिनेत्रीचा हा अनोखा पल्ला पुढे नाटक आणि मालिकांसोबतीने चालू ठेवून आज यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव संपादन करणारी…
प्लॅनेट मराठी च्या या आठवड्याची स्टार ऑफ द वीक
अभिनेत्री “सुरभी भावे”
1. तु मिलिटरी शाळेतुन शिक्षण पूर्ण केलंयस तर त्या बदल काय सांगशील?
मी साधारण पाच वर्ष मुलींच्या सैनिकी शाळेत होते. राणीलक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा जी आशिया खंडातील पहिली फक्त मुलींसाठी सुरू केलेली सैनिकी शाळा होती आणि मी त्यांच्या पहिल्या बॅच ची विद्यार्थीनि असल्यामुळे मला याचा अभिमान आहे. त्याच्या अनेक चाचण्या असतात त्या पूर्ण करून मी तिथे पोहचले आणि पुढील प्रवास सुरु झाला. मी घडण्या मागे त्या शाळेचा खूप जास्त मोलाचा वाटा आहे. इथली शिस्त आणि बाकी नियम यामुळे खुप स्वावलंबी झाली लहान वयात “सेल्फ डिफेन्स” चे धडे इथे गिरवले. नेतृत्व आणि निर्णय क्षमता लहानपणीचं अवगत झाली. आत्मविश्वास हा इथून मिळाला. माझ्या दोन्ही शाळांचा माझ्या जीवनात मोलाचा वाटा आहे. सैनिकी शाळेत फक्त पत्रव्यवहार असायचा त्यामुळे मनोरंजन म्हणजे माझ्या गप्पाचा कार्यक्रम असायचा. मी उत्तम हॉर्स रायडर झाले. सोबतिने कराटे शिकले, ब्राउन बेल्ट मिळवला. त्यामुळे नक्कीच माझ्या आयुष्यात मिलिटरी शाळेचा खूप जास्त महत्वाचा वाटा आहे. ह्यांनीच मला घडवलं.
2. अनेक प्रसिद्ध न्यूज चॅनेल वर तु या आधी काम केलंयस, हा पत्रकारिता ते एक अभिनेत्रीचा प्रवास कसा घडला?
मी १२ वी नंतर स्मिता तळवलकर यांच्या सोबत अभिनयाची कार्यशाळा करत आसताना मला मास मीडिया या कोर्स बद्दल समजलं मला अनेक नव्या गोष्टी शिकायला आवडतात म्हणून हातात एक पदवी असावी आणि नव्या गोष्टी शिकायला मिळाव्यात म्हणून मी मास मीडिया पूर्ण केलं. भूमिगत चळवळीत माझे आजोबा पत्रकार होते त्यामुळे त्यांचा कडून कुठे तरी ही एक गोष्ट माझ्या मध्ये आली असं मी समजते. पत्रकारिता पूर्ण करून तेव्हा मी (स्टार माझा) एबीपी माझा तिथे मी इंटर्नशीप करत होते. आणि ते काम मनोरंजन क्षेत्रासाठी करत होते. त्यामुळे अनेक स्टारच्या मुलाखती घ्यायला जायचे पण मग तेव्हा वाटायचं अरे नाही आपण मुलाखत देण्याचा साईडला असायला हवं. आपली कोणीतरी मुलाखत घेणं ही गोष्ट फार छान , मज्जा असते. वडील गेल्यामुळे अनेक गोष्टींची जवाबदारी माझ्यावर पडली मग आपण थोडं काम करून पैसे जमा करू असं ठरवलं मग अनेक मीडिया साठी कामं केली हे करताना आपण आता काही तरी वेगळं करायला हवं ही जाणीव झाली. मग ऑडिशन द्यायला लागले थोडीफार काम हातात येत गेली. मग त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांच्या व्यावसायिक नाटकासाठी ऑडिशन दिली आणि मला माझं पहिलं नाटक मिळाल . दिग्गज लोकं या नाटकात होते. रोहिणी हट्टंगडी यांच्या सोबत पहिलं काम करायला मिळाल. त्या आधी सुमित राघवन सोबत काम केलं. करियर च्या सुरुवातीलाच मला दिग्गज लोकांच्या सोबतीने कामकरण्याची संधी मिळाली.
3. अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल केव्हा पडलं?
सह्याद्री वाहिनीसाठी एका मालिकेत काम केलं होत.. तर ते खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रातील पाहिलं पाऊल म्हणता येईल.
4. तू अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मालिका आणि नाटकांमधून कामं करतेयस.. ह्या अनुभवाबद्दल काय सांगावस वाटेल?
करियरच्या सुरुवातीला मला अनेक दिगग्ज व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. इथे अनेक चांगली माणस भेटली. अगदी सुरुवातीलाच सुमित राघवन, चिन्मयी सुमित, उदय सबनीस, रोहिणी हट्टंगडी, चिन्मय मांडलेकर, महेश भाटकर, राहुल मेहेंदळे, सुयश टिळक, नीलकांती पाटेकर आणि आता सुबोध भावे अश्या अनेक दिग्गज मंडळी सोबत कामं करायला मिळाली. यांचा एवढा आनंद आहे आणि निश्चितच यातून खूप अभिनयाचे बारकावे शिकायला मिळतात. प्रत्येक वेळेला त्या-त्या व्यक्ती कडून काही न काही शिकत गेले. पण त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते कसं काम करतात हे मला समजून घ्यायला आवडत. लोकांना समजून घेऊन, त्यांना न्याहाळुन काम करायला आवडतं. लोकांची देहबोली बघायला आवडते. मी हिस्टरी चॅनेल साठी लोकांच्या देहबोली वर मी लिखाण करायचे या सगळ्यांचा आता उपयोग होतोय. रोहिणी ताई कडून खुप शिकत गेले. त्या वेळो वेळी मला सल्ला द्यायचा असच करत मी अनेक लोकांकडून शिकत गेले . स्वतःला फार भाग्यवान समजते की मला ती संधी मिळाली आणि मी यातून दिग्गजांसोबत काम करत गेले. माणूस म्हणून तुम्ही चांगले असाल तर तुम्ही चांगले कलाकार नक्की होऊ शकतो. खूप विशलिस्ट आहे अनेकांसोबत काम करायची आहेत.
5. एक अभिनेत्री म्हणून तु जेव्हा पत्रकारिता या क्षेत्राकडे बघतेस तेव्हा काय वेगळं पण जाणवतं?
अभिनेत्री म्हणून जेव्हा पत्रकारितेकडे बघते तेव्हा अर्थात जुने दिवस पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात. तेव्हा एक पत्रकार म्हणून कोणाची तरी मुलाखत घ्यायची आता आपली कोणी तरी मुलखात घेतं ही जी काही भावना आहे ना यातच सगळा आनंद आहे. वेगळं पण यासाठी जाणवत तेव्हा पत्रकार होते आता अभिनेत्री आहे. एक स्वप्न आहे की अमित भंडारी सरांनी माझा अभिनेत्री म्हणून इंटरव्ह्यु करावा पण यासाठी खूप मोठा पल्ला अजून गाठायचा बाकी आहे.
6. ड्रीम रोल??
ड्रीम रोल वैगरे असा कधी विचार नाही केला. पण मला असं वाटतं की भविष्यात अनेक वेगळ्या थाटणीच्या भूमिका मला करायला मिळाव्यात. त्यामुळे मी जो रोल करेन तो कोणासाठी तरी ड्रीम रोल व्हावा अशी माझी इच्छा आहे. पण कदाचित सदमा मधल्या श्री देवीचा जो रोल आहे तो मला करायला आवडेल .
7. एक कथा लेखक, सूत्रसंचालक आणि आता अभिनेत्री.. कश्यात जास्त रमतेस?
मला नव्या गोष्टी शिकायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात त्यामुळे मी खूप काही करत असते. लेखक, सूत्रसंचालक की अभिनेत्री यातलं काही तरी एकच निवडायचं झाल्यास अर्थात अभिनय.
8. खाजगी आयुष्यात सुरभी कशी आहे?
खाजगी आयुष्यात सुरभी फार बडबडी , अवखळ आणि दंगेखोर आहे . मी गप्पिष्ट आहे त्यामुळे मला शांत बसणं आवडत नाही मी खाजगी आयुष्यात फार मस्ती करणारी वैगरे आहे.
9. इंडस्ट्री मधील कुठली गोष्ट खुपते?
इंडस्ट्री मधली असली कुठलीच गोष्ट मला खूपत नाही कारण प्रत्येक जण आपल्या परीने इथे काम करत असत ते आपल्या कामातून नाव मिळवत असतात त्यामुळे मला तरी इंडस्ट्री मध्ये काही गोष्टी खुपत नाही.
10. एखादा लक्षात राहिलेला प्रसंग?? मग तो चांगला असो किंवा वाईट..
आठवणी मधले किस्से तसे बरेच आहेत, पण नाटक करत असताना त्यात मी खूप छळणारी सून असा रोल केला होता मला एक आजी चक्क मला मारायला आल्या पण त्या नंतर आम्हाला त्यामागची खरी कहाणी समजली. त्यांच्या सुनेने त्यांना मारलं होत त्यामुळे त्यांनी कदाचित ते पात्र त्यांना आपलंसं वाटलं असावं. तुला पाहते मधली पिंकी मावशी हे पात्र साकारत असताना परवा एक आजी भेटल्या त्यांनी विचारलं तू ईशा ची मावशी ना मी हो म्हटलं आणि नंतरची त्यांची प्रतिक्रिया एवढी कमाल होती त्यांनी असं सांगितलं की हा भुरचटपणा जरा कमी करा. अनेक सल्ले दिले पण माझ्यासाठी ही माझ्या कामाची पोचपावती होती. लोकांना हा भोचकपणा एवढा भावाला ते लोकांनी आपलंसं करून घेतलं. सख्या रे करताना प्रिया पाठारे सासू होती आणि खूप छळणारी सासू होती तर एका बाईने भेटून सांगितलं की कसं एवढं सहन करतेस वैगरे . आता पर्यंत लोकांनी प्रत्येक भूमिकेवर तेवढं प्रेम केलंय. लोकांची थेट पावती मिळणं हे अनोखं असतं.
11. मी टू मोहीम चालू असताना मराठी इंडस्ट्री मधून कोणीचं काही बोललं नाही.. तू काय सांगशील ह्यावर?
मराठी इंडस्ट्री ही एवढ्या लोकांनी भरलेली आहे की इथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे लोक आपल्याला भेटत असतात. त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो त्यामुळे कदाचित मी टु मोहीम आपल्या इंडस्ट्रीत घडली नसावी अस माझं स्पष्ट मत आहे. विश्वासाच्या जोरावर इथे लोक एकमेकांशी जोडली आहेत.
12.तुझ्या सोशल मीडिया पोस्ट वरून तुला गायनाची सुद्धा आवड आहे हे समजतं.. काही रियाज वगैरे करतेस कि फक्त आवड?
हो गायनाची आवड आहे . घरात किंवा सेट वर कधी मोकळ्या वेळात मी गाते आणि गाण्याची हौस भागवून घेते . माझ्या आई कडे अनेक नातेवाईक घरचे नाट्य संगीतात होते त्यामुळे मला संगीत आई कडून मिळालं आहे पण मला खरंच गाणं शिकायचंय . रियाज वैगरे नाही पण आवड म्हणून गायन आवडतं.
प्लॅनेट मराठी कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !